Showing posts with label विचार. Show all posts
Showing posts with label विचार. Show all posts

Monday 12 November 2012

दानाचे महत्व




                  कालच पेपर वाचताना पहिल्या पानावर शिर्डीच्या साई बाबंचा मोठा फोटो पहिला...म्हंटल वाह आज सकाळ सकाळी....देवाच दर्शन झाल आज दिवस चांगला जाणार.....पण खालची बातमी वाचली आणि मला धक्काच बसला.......कोणी एका अनोळखी इसमाने शिर्डीच्या साई बाबांना ९० लाखांची दोन सोन्याची ताट भेट केली....ते पण दान म्हणून.....आणि आता त्याच ताटातून बाबांना प्रसाद भेट चढवणार आहेत.......वाह काय चांगली बातमी असल्या सारख पेपर वाल्यांनी हि बातमी मोठी करून पहिल्या पानावर छापली.....

आता मला सांगा शिर्डीच्या साई बाबांनी अख्ख आयुष्य फकिरा सारख काढाल....आणि आपला सगळा वेळ गोर-गरिबांच्या मदतीसाठी दिला....त्या शिर्डीच्या साई बाबांना तुम्ही सोन्याच्या ताटात प्रसाद अर्पण करून तुम्ही त्यांचा अपमान नाही का करत.......?
आणि मला नवल याच वाटत....त्या इसमाच……..९० लाख तू बाबांना भेट म्हणून देतोस....अरे त्यापेक्षा कुठल्या गरिबांना मदत केली असतीस तर त्यांच्या आयुष्याच सोन झाल असत.......बाबा तर श्रद्धेचे भुकेले आहेत....ते काय करणार सोन्याच्या ताटाच ? पण नाही……
लोकांना अजून दानाच महत्व कळल नाहीये.....मी इथे काय कुणाला दान काय कराव हे सांगायला बसलो नाही......पण माणसाने दान काय कराव हे तरी कळायला हव ना......
त्याच सोन्याच्या ताटापेक्षा जर त्या इसमाने कुठल्या अनाथ आश्रमाच्या लहान मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला असता.......
किंवा एखाद्या OLDAgeHome ला दान केल असत तर......किती पुण्य मिळाला असत त्या लोकांच.......पण लोक असा विचार कधीच करत नाही..........दान हे कुठल्याही फळाची अपेक्षा करत करायचं असत.........लोक दान करतात ते स्वार्थापोटी........ “ देवा आता मी तुला १० तोळ सोन चढवतो आहे पुढच्या वर्षी माझ्याकडे २० तोळ सोन येऊ दे “ काय आहे हे.......
देवाला सोन्या-चांदीची अपेक्षा नाही....तो फक्त भक्ताच्या भक्तीसाठी भुकेला असतो......देव कधी सोन आणि चांदी देऊन खुश नसतो होत....तो आपल्या भक्ती वर खुश होतो....पण लोक ह्याचा विचार कधी करत नाही.......लोक फक्त आपला फायदा पाहत असतात......फक्त आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असतात

म्हणून कधीही देवाला दान देण्यापेक्षा एखाद्या संस्थेला दान दान करा.....तुमच्या मिळालेल्या त्या पैश्यामुळे गोर गरिबांची मदत होईल......बाबांनी आपल उभ आयुष्य गोर-गरिबांची मदत करण्यात घालवाल.....आपण सुद्धा बाबांनी सुरु केलेल्या कार्याला थोडा हाथभार लावू.......आणि बाबांना पण तेच हव आहे

Monday 22 October 2012

दगडा मधला देव

God

खरच देव दगडा मध्ये आहे का ?
असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे……पण मला पडला आहे

अंधश्रध्ये पायी, बरेच भाबडे लोक बळी जाऊ लागले आहेत
आजही आपल्या खेड्या पाड्या मध्ये भोंदू बाबांच्या आहारी जाऊन लोक, आपल्या जिवलग लोकांचा जीव गमवतात.....
पण हे दृश्य आता खेड्या-पाड्या मध्येच नाही तर शहरा मध्ये पण दिसू लागल आहे……..आजकाल सुशिक्षित लोक सुद्धा अंधश्रध्येचे बळी पडत चालले आहेत

बरेच लोक दर सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन १ लिटर दुध चढवतात याच आशेने कि देव आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल
पण तुम्ही हे का विसरता अख्ख्या भारता मध्ये दर दिवशी हजारो मुल उपाशी पोटी झोपतात आणि तुम्ही हजारो लिटर दुध देवाला वाहता.......माझी देवावर श्रद्धा नाही अस मी म्हणतच नाही पण त्याच एक लिटर दुधामधल  अर्धा  लिटर दुध जरी  एका गरीब मुलाला दिल तर त्या दिवशी  आपल्या मुळे एक मुलगा तरी उपाशी झोपला नाही ह्या गोष्टीने मनाला भेटणारी शांती हि देवाला चढवलेल्या एका लिटर दुधापेक्षा जास्त असेल हे नक्की….! आणि देव काही म्हणत नाही मला १ लिटरच दुध हव आहे त्याशिवाय मी तुझ्या इच्छा पूर्ण करणार नाही हे सगळे आपले मनाचे खेळ.
हे सर्व आपल्या श्रद्धे वर अवलंबून आहे कि आपण काय मानायचं आणि काय नाही "
जर तुम्ही अभ्यास केलाच नाहीत तर तुम्ही देवाला फक्त दुध चढवून पास होणार आहात का ?  नाही ना
तसच श्रद्धे बरोबर मेहनतीची पण गरज आहे तरच देव सुद्धा तुम्हाला मदत करेल देवावर श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको......

असाच अजून एक मला आलेला अनुभव…….
मी ज्या रस्त्याने घरी जातो तिथे बरेच लोक सकाळी जॉगिंग करून झाल कि १० रुपयाची पारले-जी ची बिस्किटे कुत्र्यांना देतात पण त्याच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेली चार पाच लहान मुल या आशेने बघत असतात कि आता तरी हे लोक आम्हाला दोन बिस्किटे देतील पण हे कधीच होत नाही
का त्या लोकांना त्या मुलांच्या चेहऱ्या वरील भूक दिसून येत नाही का ?
कि त्या गरीब मुलापेक्षा ती कुत्री त्यांना जवळची वाटतात का ?
का त्यांना माणूस आणि जनावरा मधला फरक दिसून येत नाही
मला कोणाला काहीही शिकवणूक द्यायची नाही पण एक माणूस म्हणून माणसाची किंमत करायला नको
गरीब असला म्हणून काय झाल त्याला पण भूक लागते , उपाशी राहिल्यावर त्याला पण झोप लागत नाही
दगडाला तर देव आपण बनवला पण देवाने तर तर माणसातच एक देव लपवला आहे हे आपण विसरलो
विचारा त्या गरीब मुलाला त्याच्यासाठी जो त्याची भूक शमवतो तोच त्याचा देव,
विचारा त्या शिष्याला त्याला जो विद्या शिकवतो, तो गुरु त्याचा देव

सगळ्या रुपात देव माणसा मध्येच लपला आहे........कुठल्याही दगडच्या मूर्ती मध्ये नव्हे  
म्हणून देवाला माणसा मध्ये शोधा दगडात नव्हे……….





Wednesday 3 October 2012

चौकट

chaukat





आपण आपल्या आयुष्याला एका चौकटीच्या आतच ठेवलं आहे........आणि आपण एका मर्यादित चौकटीतच जीवन जगतोय अस कोणाला वाटत का ?
कदाचित काही लोकांच उत्तर हो असेल तर काहींच नाही.....कारण काही लोकांना या चौकटीच्या पलीकडे जायचाच नाही तर काही लोकांना या सगळ्या चौकटी ओलांडून त्याच्या सगळ्या हद्द पार करायच्या  आहेत पण ते करत नाहीत....
पण काय आहे हि चौकट ? प्रत्येक माणसा प्रमाणे ह्या चौकटीची व्याख्या बदलत जाते.....तुम्हाला कधी अस वाटत नाही आपण रोज एक routine  life  जगतोय...रोज त्याच वेळेला उठन, तीच ट्रेन रोज तेच office  च काम......पण यावर तुम्ही म्हणाल हे तर सगळेच करतात......त्याला पर्याय नाही पण आम्ही  शनिवार आणि रविवारी एन्जोय करतो..... 
आम्ही दर शनिवारी आणि रविवारी बाहेर जेवायला जातो, महिन्यातून एका रविवारी movie  बघतो , आणि ३ महिन्यातून एकदा बाहेर फिरायला जातो.......म्हणजे हि  पण एका प्रकारे तुम्ही आखलेली एक चौकटच ना आणि ते पण एक routine च आहे  कि नाही........
रोज जेवण बनवायला कंटाळा येतो ह्या सत्याला पांघरून घालायला तुम्ही शनिवारी आणि रविवारी बाहेर जाता अस मला सांगता.....
आता तुम्ही स्वताला च काही प्रश्न विचारा.....
ह्या रोजच्या routine  work  मध्ये तुम्ही काही नवीन करता का ?....office  मध्ये काम नसल कि तुम्ही कधी काही वेगळ करायचा प्रयत्न करता का ?
ह्यावर सगळ्यांचा प्रश्न म्हणजे आम्ही नक्की करायचं काय ?
हेच.....या तुमच्या आखलेल्या चौकटीतून बाहेर पडाल तर तुम्ही विचार कराल ना....अरे बाहेर बघा.....हे office  , घर , आणि रोजच routine  काम सोडून  सुद्धा बाहेर एक जग आहे......आणि ते खूप सुंदर आहे......
काहीतरी वेगळ करायचा प्रयत्न तरी करा........फक्त बाहेर जेवायला जाण्यापेक्षा एका रविवारी तुम्ही जेवण बनवा आणि तुमच्या हाथाने तिला  जेवू घाला......त्या भाजीत तिखट-मीठ कमी असल तरी ती भाजी तुमच्या हाथून खाताना  तिच्या चेहऱ्यावरचा आनंद त्या five  star  हॉटेल मध्ये जेवलेल्या  जेवणा पेक्षाही जास्त असेल....
movie  बघण्यापेक्षा बऱ्याच वर्षा पासून तुम्ही न गेलेल्या मराठी नाटकांना जावा......नाहीतर असच तिच्या बरोबर  भटकायला निघा......३ तास movie  मध्ये तिच्या  बाजूला शांत बसण्या पेक्षा तिच्याशी छान गप्पा मारा.......बघा तुम्हाला किती बर वाटेल.....
अरे मित्रानो फिरा , मजा करा आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्याला एका चौकटीत आखून ठेवू नका....ह्या आखलेल्या चौकटीतून कधीतरी बाहेर पडा , काहीतर आज वेगळ करा म्हणजे तुमचं सुंदर आयुष्य अजून सुंदर होईल........







Saturday 22 September 2012

कोपरा....

कोपरा kopara



 कोपरा.....! हा शब्द ऐकल्यावरच  लगेच तुमच्या डोळ्या समोर फक्त एकच चित्र येते......ते म्हणजे घराची एक अडचणीची जागा.......जिथे तुम्ही तुम्हाला नको असलेल्या वस्तू ठेवून देता
जशी शाळेतली ती जुनी पुस्तक , तुमची लहान पनीची remote  ची car ,  तुमची जुनी कपडे वगैरे.......
कारण ह्या सगळ्या वस्तू आता तुम्हाला  नकोश्या झालेल्या आहेत म्हणून आपण त्या घराच्या एका कोपऱ्यात टाकून देतो......
"बरोबर आहे मुळात कोपरा असतोच त्यासाठी आणखी काय त्याच काम" हे सगळ्यांच एकमत उत्तर......तस तुमच पण बरोबर आहे कारण आपण कधी त्या घराच्या कोपऱ्याला एवढ महत्व  दिलच  नाही.........कारण एवढ असत तरी काय  त्या कोपऱ्यात ?
पण तुम्ही कधी विचार केलाय या कोपऱ्याने  तुमच्या बऱ्याच  वर्षाच्या आठवणी साठवून ठेवलेल्या असतात.......
कस आहे माणूस म्हंटल कि आठवणी असणारच आणि आपण त्या विसरणार सुद्धा साहजिक आहे........... पण तुम्ही विचार केलाय तो कोपरा वर्षा नु वर्षे त्या आठवणी जपून ठेवतो..........कारण आपल्या त्या आठवणीचा तो एकमेव सोबती असतो.....
तुमच्या घराच्या कोपऱ्यात जुनी पुस्तक पण पडली असतील आणि ती आता तुमच्या काहीच कामाची नसतील..........पण त्याच जुन्या पुस्तक मध्ये एक पुस्तक अस पण आहे.............ज्यातून तुम्ही तुमच पाहिलं love  letter  दिलेलं असत.....
ह्म्म्मम आठवल ना...............तुम्ही ते love  letter विसरलात पण त्या कोपऱ्याने ते पुस्तक आणि त्या बरोबरच्या सगळ्या गोड आठवणी जपून ठेवलेल्या आहेत......
आज तुमच्या कडे मस्त बाईक आहे......पण बाबांनी दिलेली ती पहिली remote  ची car आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आलेला आनंद त्या कोपऱ्याने अजूनही जपून ठेवलेला आहे.....
आपण कधी एवढा विचार केलाच नाही कि...........घराचा तो कोपरा, आपल्या एवढ्या आठवणीचा सोबती असेल म्हणून.....हो ना .
आणि अश्या बऱ्याच गोष्टी पण असतील ज्या आपण कोणालाच सांगीतल्या नाहीत......फक्त त्या तुम्हालाच  माहिती आहेत......पण  तुमच्या बरोबर त्या कोपऱ्याने   सुद्धा त्या सगळ्या आठवणी गुपीत ठेवलेल्या आहेत......
कारण आपल्या आठवणीचा तो खरा सोबती आहे............त्याने त्या तुमच्या  सगळ्या गोड आठवणी अजूनही त्याच्या उराशी जपून ठेवलेल्या आहेत......आणि त्याही कायमच्या.........!